Description
काश्मीर-समस्येची खरी कहाणी याच नावाच्या १९९५ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाची हि संक्षिप्त आवृत्ती. ग्रंथ संक्षिप्त केलेला असला तरी काश्मीर समस्या मात्र वाढलेली आहे ; अधिकच गंभीर,स्फोटक बनलेली आहे !या ग्रंथाचा हेतू काश्मीर -प्रश्न मुळात काय आहे व तो का सुटत नाही ,याचे सत्यकथन हा आहे .* तेथील महाराजांना भारतात विळी व्हावयाचे नव्हते ,हा प्रवाद खरा आहे काय ?*त्यांना पाकिस्तानात विलीन होण्याचा सल्ला भारताने का दिला होता ?*संस्थानांच्या विलीनकरणाचे भारताचे धोरण कोणते होते ?*विलीन करून घेताना सार्वमताचे लेखी आश्वासन का देण्यात आले ?*तरीही नंतर सार्वमत का घेतले गेले नाही*घटनेत ३७० कलम कसे व कशासाठी आले ?*पं .नेहरूंनी पंतप्रधान शेख अब्दुल्लांना कारागृहात का टाकले ?*तेथे अराजकाची व दहशतवादाची सुरुवात केव्हा झाली ?या व अशा अनेक प्रश्नांची खरे उत्तरे या ग्रंथात सापडतील भरभक्कम पुराव्यांनिशी यांत मांडलेले दाहक सत्य कितीही अप्रिय वाटले तरी राष्ट्रासाठी ते समजून घ्यावेच लागेल .कोणत्याही राष्ट्रीय प्रश्नाच्या खऱ्या स्वरूपाचे अज्ञान हाच मूलतः एक राष्ट्रीय शाप आहे .म्हणूनच काश्मीर हे ‘शापित नंदनवन’ ठरले आहे !
Reviews
There are no reviews yet.