Description
सार्या ब्रह्मवृंदासमोर याज्ञवल्क्याच्या बुद्धिमत्तेला आव्हान देणारे, त्याला हैराण करणारे प्रश्न विचारीत अखेर त्याला सर्वश्रेष्ठत्वाचं प्रशस्तिपत्रक देणार्या गार्गीचा काळ खूप मागे पडला.पण गार्गी अजून जिवंत आहे.एकोणिसशे चौदाच्या आसपास उत्तर प्रदेशमधल्या एका छोट्याशा खेडेगावात जन्मलेली गुलाब!वयाच्या अकराव्या वर्षी तिनं तत्कालीन ब्राह्मणवर्गाला प्रश्न केला,’अंत्यविधीचे कार्य करण्याचा अधिकार स्त्रीला का नाही?’नुसता प्रश्न करूनच गुलाब थांबली नाही, तर सार्या विरोधाला मोडून काढून गंगेच्या किनारी तिनं स्वतःचा घाट बांधला.रसुलाबाद घाट!तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा सार्या घाटावर दरारा आहे. भले भले ज्ञानी पंडित तिच्यासमोर नतमस्तक आहेत. तिच्याकडे पाहाताना गार्गीचा भास होतो. आणि मनात येतं, कोण म्हणतं गार्गी भूतकाळात जमा झाली? गार्गी अजून जिवंत आहे…
Reviews
There are no reviews yet.