Description
। वेदमंत्राहून आम्हां वंद्य ‘वंदे मातरम’। वंद्य ‘वंदे मातरम’॥
अशा पवित्र वंदे मातरम च्या जयघोषात पुण्यवंतांनी केला पराकोटीचा त्याग, तेव्हा कुठे दीडशे वर्षांनंतर उगवली स्वातंत्र्याची पहाट !आता ७५ वर्षांनंतर काय आहे चित्र आपल्या देशाच नि समाजाच? गर्वान ऊर भरून यावा अस काही घदल का? वेदनांचा पूर यावा इतक काही बिघडल का? हुतात्म्यांचा त्याग लागला का सार्थकी ? केली का आपण पायाभरणी एका बलाढ्य राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यकाळाची ? आपले सैनिक,शिक्षक, शेतकरी, आपले शास्त्रज्ञ, राज्यकर्तेही आपलेच आणि अधिकारीही आपणच आणि आपण सारेच नागरिक ? केली का आपण आपापल्या क्षेत्रात कर्तव्यपूर्ती ? उद्दिष्टप्राप्ती? शेतकीपासून शिक्षणापर्यंत, अवकाश मोहिमेपासून अणुकरारापर्यंत, हरितक्रांती, दुग्धक्रांती, माहिती तंत्रज्ञानामधली क्रांती, दूरसंचारातली प्रगती, अन्नसुरक्षा, ऊर्जानिर्मिती, आर्थिक विकास दारिद्राी दोन हात, दहशतवादावरती वात.. नानाविध क्षेत्रांत जगातल्या इतर कुठल्याही नवस्वतंत्र्य राष्ट्रापेक्षा खूप काही जास्त साध्य केल आपल्या भारत देशान.. पुरावे हवेत? तर हा घ्या आपल्या अमृतमहोत्सवी कामगिरीचा आलेख. काय कमावल, कस मिळवल यांचा धावता लेखाजोखा मांडणार हे पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.